Saturday, October 8, 2016

फडक्यातली भाकरी

फडक्यातली भाकरी...

*फडक्यातील भाकरी*
🍪🍪🍪🍪🍪🍪

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

*शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र स्तरावर शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज *दि.17 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद पार पडल्या.*
*याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षण परिषद मा. गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.*
या परिषदेमध्ये केंद्रातील ज्या शिक्षकांचे प्रगत वर्ग आहेत,प्रगत शाळा  आहेत ,तसेच ज्या शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे अश्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे सादरीकरण व्हिडीओ,पीपीटी यांच्या साहाय्याने केले.यावेळी सम्पूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं दिसून आले.

*राशिन केंद्राच्या परिषदेमध्ये आदरणीय शिक्षण आयुक्त मा. धीरज कुमार साहेब व मा. शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी मोबाईल फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला व एकंदरीत परीषदेचा  आढावा घेतला .आदरणीय साहेबांच्या या फोन संदेशा मुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.*

*यानंतर कोरेगाव केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी असणारा ..स्फूर्तीचा अखंड झरा..आधुनिक सावित्रीमाई लातूरच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय मा.तृप्ती अंधारे यांनी फोन द्वावारे शिक्षकांशी संवाद साधला.*एकंदरीतच आज संपूर्ण कर्जत तालुका शिक्षणमय झालेला दिसून आला.
प्रत्येक शिक्षक आपण करत असलेले काम इतरांना समजून सांगत होता,आपल्या यशाचे गमक सांगत होता,तसेच स्वतः ची शाळा प्रगत करण्यासाठी ,समृद्ध करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या हे हि सांगत होता.यातून प्रत्येक  शिक्षकाला नवीन दिशा मिळत होती.
आज एकंदरीतच प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी काय करता येईल हे एकमेकांना सांगत होता

आजचे आदरणीय मान्यवरांचे फोनवरील मार्गदर्शन,शिक्षकांशी साधलेला संवाद खूपच प्रेरणादायी ,सकारात्मक ऊर्जा देऊन गेला.

आजची ही शिक्षण परिषद पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,उपक्रमशील शिक्षक व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शिंदे साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले

*मी एक शिक्षक म्हणून मला काही केंद्रामध्ये माझ्या शाळेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली ,माझ्या शाळेचे काम मला सादर करता आले हे मी माझे भाग्य समजतो.*

खरच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचे आयोजन हा शासनाने घेतलेला स्तुत्य उपक्रम... असेच मी तर माझ्या शब्दात वर्णन करेल...
🙏🙏🙏🙏🙏


*विक्रम अडसूळ*
*कर्जत ,अहमदनगर*

*9923715464*

💐💐💐💐💐💐

पुणे विभागीय शिक्षण परिषद- बारामती

पुणे विभागीय शिक्षण परिषद-बारामती

*बारामती शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*दि 24 व 25 जुलै 2015 या  कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची दोन दिवशीय विभागीय कार्यशाळा पार पडली.वास्तविक पाहता यातील मी कसलाही* *प्रशासकीय अधिकारी नाही तरीही मला या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब यांनी दिली त्याबद्दल साहेबांचे प्रथमतः आभार व धन्यवाद*
🙏🙏🙏🙏

पहिल्या दिवशी काही शाळा तसेच केंद्र स्तर व गटस्तरावरील सादरीकरण झाले ,प्रथम दिवशी *आदरणीय नामदेवराव जरग साहेब* दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थित होते.साहेबानी अगदी समर्पक असे प्रश्न विचारत सभागृह बोलते केले आणि प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी त्यांच्या समर्पक शब्दात सांगितले

त्याचबरोबर *आदरणीय दिनकर टेमकर साहेब* हे ही या परिषदेसाठी दोन दिवस उपस्थित होते,त्यांनी हि सभागृहाला योग्य असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील काही उदाहरणे देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेले हे त्यांनी सांगितले .आदरणीय साहेबानी दिलेल्या उदाहरनांपैकी नांदेड जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी असताना फोन वर घडलेला किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हस्या पिकला
आदरणीय साहेबानी या परिषदेसाठी फार कष्ट घेऊन परिषद यशस्वी केली

जिल्हास्तारावरील सादरीकरणात *आदरणीय अशोक कडूस (शिक्षणाधिकारी अहमदनगर)* *मुस्ताक शेख(शिक्षणाधिकारी* पुणे) ,घाटगे साहेब (शिक्षणाधिकारी सोलापूर)  तसेच डायट प्राचार्या मेटे मॅडम व औटें मॅडम यांनी सादरीकरण केले ,यामध्ये प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला
आदरणीय कडूस साहेब यांनी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी काय केले ?
काय करत आहे ? पुढील दिशा समजावून सांगितली

 गटस्तरावरील सादरीकरणात
पंढरपूरच्या *गटशिक्षणाधिकारी *सुलभा वठारे मॅडम,नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,* यांनी आपल्या कार्याचा आलेख सांगितलं तसेच पंढरपूर मधील दत्तक शाळा उपक्रम फारच सकारात्मक वाटला

तसेच नेवासा तालुका राजकीय व शिक्षक संघटनात्मक संवेदनशील असूनही एक महिला अधिकारी म्हणून करत असलेल्या कामाची पद्धत सर्वाना एक नवी उमेद देत होती

वाबळेवाडी व पावरवाडी या शाळेनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले

दुसऱ्या दिवशी केंद्र स्तरावरील सादरीकरण झाले

पूर्णा तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब* यांनी त्यांच्या खड्या आवाजातील मार्गदर्शनात काम कसे करावे व काम कश्यासाठी करायचे हे समजावून सांगितलं
शेवटी साहेबानी वामनदादा कर्डक यांची कविता गायन करून सभागृहामध्ये नवचैतन्य निर्माण केले
बऱ्याच दिवसाची साहेबांनी गायलेली कविता ऐकायची इच्छा पूर्ण झाली

त्याच बरोबर गेवराईचे विस्तार अधिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व *काळम पाटील साहेब* यांनी त्यांनी लोकसहभाग कसा जमवला हे सांगून व काम कसे केले याविषयी मार्गदर्शन केले


अचानक सभागृहात प्रवेश झाला तो स्फूर्तीचा अखंड झरा असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सावित्रीचा म्हणजेच..

*लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे* यांचा
तृप्ती ताईंनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कार्याची माहिती देऊन सभागृहातील सर्वाना काम करत रहा हे सांगितले

दुपारी एक वाजता आदरणीय
*शिक्षण संचालक नांदेडे साहेब व शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* आले
या मान्यवरांच्या समोर मला सादरीकरण करण्याची संधी मिळाली हे मी माझे
भाग्य समजतो

आदरणीय नांदेडे साहेब यांनी अगदी प्रेरणादायी शब्दात सम्पूर्ण सभागृहाला काम करण्याची प्रेरणा दिली,प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण केली
आभाळा एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व पण  कसलाही मी पणा नाही कि पदाचा गर्व नाही
साहेबांकडून खूप काही शिकता आले,साहेबानी मूल शिकलं पाहिजे याचे आवाहन केले

*शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेब* यांनी त्यांच्या शैलीमध्ये उपस्थित सभागृहाला  विविध उदाहरणाचा दाखल देत मार्गदर्शन केले यातील साहेबांचे रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मुलगा वडील आणि गाडीतील सहप्रवाश्याचे उदाहरण देऊन लोकांच्या मनामध्ये नवचैत्यन निर्माण केले
*तसेच प्रगत मधील प्र म्हणजे*
*प्रेरणा ,प्रयत्न व प्रगती या* शब्दात वर्णन केले

या परिषदेसाठी आंग्लभाषा औरंगाबाद चे कांबळे साहेब ही दोन दिवस उपस्थित होते

या परिषदेच्या  नियोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या हवेलीच्या *गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार मॅडम* यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

प्रत्येक परिसंवाद सादरीकरणाचे नियोजन अगदी सुंदर असे केले
त्याच बरोबर *संगीता शिंदे मॅडम* यांनी त्यांना छान अशी साथ दिली

तसेच पुण्याचे *उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब* व इंदापुरचे गटशिक्षणाधिकारी गुरव साहेब यांनी
 आपल्या अनुभवाच्या आधारे अतिशय कार्यकुशलतेने परिषदेचे आयोजन केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने  अंमलबजावणी केली. आज पुन्हा त्याच्यातील  कुशलनेतृत्व दिसले.
एकंदरीतच ही दोन दिवशीय शिक्षण परिषद फारच सकारात्मक झाली.या दोन दिवसात खूप काही शिकता आले

*ही परिषद माझ्यासाठी खुप प्रेरणादायी ठरली कारण आपण करत असल्या कामाची पावती आज मिळाली*


यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो
🙏🙏🙏🙏🙏

*विक्रम अडसूळ*
*कर्जत अहमदनगर*
*मोबा.9923715464*

शिक्षणाची वारी

शिक्षणाची वारी..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र  
     🔷 (ATM)🔷

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या  महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत "शिक्षणाची वारी"या उपक्रमाचे आयोजन बालेवाडी पुणे येथे दि.२७/१/१६ ते दि.३१/१/१६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
विविध विषयांवरील नानाविध स्वरूपाचे 54 स्टॉल्स आपल्याला येथे पाहावयास मिळत आहेत.

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) ग्रुपच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.कविता बंडगर यांचा भाषा, गणित व भूगोल या विषयाचा स्टॉल येथे लावण्यात आला आहे.
---------------------
स्टॉल क्रमांक-29

🔷स्टॉल मध्ये सहभागी:🔷

१)सौ.कविता बंडगर मॅडम
२)सौ.ज्योती बेलवले
३)श्री.विक्रम अडसूळ
४)सौ.मनीषा पांढरे
५)श्री.उमेश कोटलवार

♦स्टॉल ची वैशिष्ट्ये:♦

👉१)मनोरंजक पद्धतीने भाषाध्यपन कसे करता येईल याचे मार्गदर्शन.

👉२)गणित विषयक आवड निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे खेळ घेऊन विषयात गोडी निर्माण करता येते याचे प्रात्यक्षिक.

👉३)रचनावादी पद्धतीने भाषा, गणित व भूगोल साहित्य कशापध्दतीने करता येईल याचे मार्गदर्शन.

👉४)टाकाऊ वस्तुंपासून सुलभ आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य कसे तयार करता येते याची माहिती.

👉५)विविध भाषाविषयक व गणितविषयक उपक्रम  कसे राबवता येतात याची माहिती दिली जात आहे.

👉६)वाचन, लेखन, गणन यावर आधारित भरपूर खेळ.

👉७)ABL तसेच रचनावादी पद्धतीने बनविलेले नानाविध प्रकारचे साहित्य.
याशिवाय बरच काही आपल्याला स्टॉल क्र.29 वर पाहायला मिळेल.

एकवेळ अवश्य भेट देऊन जाणून घ्या...

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रास देण्या योगदान,
धडपडत्या Atm टीमचे कार्य महान"

धन्यवाद..!

✒✒✒शब्दांकन✒✒✒
         ज्योती दीपक बेलवले

🔷कृतिशील शिक्षक महाराष्ट्र(ATM)🔷

ज्ञानरचनावाद राबवताना....

ज्ञानरचनावाद राबवताना...

ज्ञानरचनावाद राबवताना.....


आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो

सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल

✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.

किंवा याहून सोपे


✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे

आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल

जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत

प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते  आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे

वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं


आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया


वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?

रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते  ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः  विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.

उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠

माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.

तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.

परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच  विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.

उदा- दगडांचा पाऊस पडला तर....

आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..


आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.


        विक्रम अडसूळ
     कर्जत अहमदनगर